गेले काही वर्षे ट्रेक बन्द ज़्हाले होते त्यामुळे या वेळी वासोटा ला जायचे या विचारानी मी खुष होतो. कार्यालयातील सहकार्या बरोबर जाण्याचा हा उपक्रम कसा काय जमेल असे विचार येत होते. २६ रविवार चा बेत ठरला ..


विकत घेतली ( जळवाच्या वर औषध ..) आणी नौके मधे बसुन वासोट्या कडे प्रयाण केले.
कोयनेच्या धरणाचा साठा किती प्रचन्ड आहे त्याचा अनुभव घेत वासोट्या ला १.३० तासानी पोचलो.


साधारणपणे २-२.३० तासाच्या चढणी नतर वर पोचलो. वर एक मारुति मदिर भग्नावस्थेत आहे तिथेच एका सर्प राजानी दर्शन दिले.गडावर शकराचे एक मदिर आहे तिकडे बसुन पोटपुजा केली. जवळच्या तळ्यातले पाणी प्यायलो, प्रथम प्यावे का नाही असा सभ्रम होता पण काय होईल ते बघु असा विचार केला आणि तहान भागवली.

गडावरुन नगेश्वराच्या गुहा आणि वर फ़डकणारा भगवा ध्वज दिसतो. दुसर्या टोका वरुन जुना वसोटा, त्याचा बेलाग कडा (बाबु कडा ?) कोकण कड्याची आठवण करुन देतो.
२.३० च्या सुमारास गड उतरायला सुरवात केली. रमत गमत ३.४५ ला खाली पोचलो आमची नाव ४-४.३० येणार असल्यामुळे वन खात्याच्या लोकच्या कडे चहापान केले. ४.३० च्या सुमारास नावेत बसलो, बसल्यावर एकदा कुठे जळु नाही ना याची पहाणी केली त्या मधे असे अढळले की एका मित्रा ला गळु नी आपला प्रसाद दिला आहे. रक्त पिउन टम्मफ़ुगलेल्या जळुचे फोटो कढले. मित्राला मलमपट्टी
करणार तर नावचालक म्हणाला काहि लावु नका चुना लावा मग तो उपचार केला. बर्याच वेळाने रक्त थामले. आश्चर्याची गोश्ट म्हणजे त्या मित्रा ला जळु चावात असताना एक कण पण समजले नाही.


६.०० ला बामणोली ला पोचलो थोडी पोट पुजा केली आणी परतीचा प्रवास सुरु केला १०.०० ला पुण्यात पोचलो. एक छान ट्रेक चे समधान मिळाले.